प्रश्न किती अनेक
उत्तर फक्त एक ।
आहे जगायचे मला
विचार किती नेक ।
जगण्यासाठी सारी
चढाओढ चाले ।
हाती कुणाच्या पुष्प
तर कुणाच्या भाले ।
वादळ वारे येती
देऊन दुःख जाती ।
उरते काय शेवटी
या रिकाम्या हाती ।
घेतो वेचून क्षण
काही थोडे सुखाचे ।
आसवं सुकून गेली
करू काय दुःखाचे ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment