" माझे मन "
माझ्या कविता - By Sanjay Ronghe
Wednesday, October 27, 2021
" ओंजळ "
नको कुणाला सुख
असते दुःखच पाठी ।
नशिबाचा फेर सारा
बांधून दुःखाच्या गाठी ।
सोडवू कसे स्वतःला
करते दुःखच दाटी ।
दिवस रात्र करतो यत्न
पळतो सुखाच्या साठी ।
सुख म्हणे जसे पाणी
नाही प्रत्येकाच्या वाटी ।
ओंजळीत मावेल किती
करू कशी ती मी मोठी ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment