येईल कधी ती वेळ
नकळे कधी कुणास ।
हळूच देऊन जाते
क्षणभर सुख मनास ।
लाभतो आनंद किती
दिसे गालावर सुहास ।
जीवनातले क्षण तेच
नसे दुःखाचा आभास ।
वाटे सार्थक जगण्याचे
भरतो सुखाचे श्वास ।
कधी तुटतो विश्वास
होतो कती मग त्रास ।
जीवनाचे रंग किती
चाले सुखाचा प्रयास ।
निखळतो तारा जेव्हा
असे तोची अंतिम श्वास ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment