बंधन कुठे कुणावर
सांगू दे त्यालाही काही ।
मनात कुणाच्या काय
समजत कुणालाच नाही ।
शब्दांचे तर अर्थ किती
होतो कधी तो अनर्थ ।
बघतील डोळे जेही जे
नाहीच दिसत तो स्वार्थ ।
नकळत जेव्हा होते प्रेम
माया ममता सांगे सारे ।
ओढ मनाला लागे जेव्हा
आनंदाचे तर वाहे वारे ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment