जीवनात किती चालायचं
कुठेतरी आहे थांबायचं ।
नाही अंतच या वाटेला
अविरत पुढे पुढे जायचं ।
विचारच नको कशाचा
होऊ दे ना जे जे व्हायचं ।
अडथळ्यांची आहे शर्यत
फिरून कशास बघायचं ।
आहेत पुढे खाच खळगे
त्यांनाही पार करायचं ।
सुख असो वा असो दुःख
हे तर सगळं चालायचं ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment