पहिल्या पावसाची तर
असते तऱ्हाच न्यारी ।
वाट बघतात सारे
करून सारी तयारी ।
नागर वखर फिरवून
जमीन होते तयार ।
वाट बघतो बळीराजा
करतो पावसाचा विचार ।
सूर्याच्या तापत्या कहाराने
होतात सारे बेजार ।
बघतात वाट पावसाची
वाटे स्वप्नांचा आधार ।
धरा पण असते प्रतीक्षेत
निसर्गाला येण्या बहार ।
नदी नाले, तलाव झरणे
वाहे पाण्याची धार ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment