कधी पाहताच क्षणी प्रथम
वाटते व्हावी खूप जवळीक ।
ओढ लागते मग मनाला
नसते तीही कधी क्षणिक ।
लागते मन मग झुरायला
होते आस अधिकाअधिक ।
अन्न पाणी लागे ना गोड
होई क्षुधा अति अगतिक ।
प्रेमच कदाचित असावे ते
वेदना असते ती आंतरिक ।
नजरेला लागती वेध किती
प्रेमाची अवस्था ती भावनिक ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment