नको वाट पाहू
गेला उडून पाऊस ।
आकाश निरभ्र झाले
नको दूर जाऊस ।
अजून आशा मनात
रिमझिम होईल पाऊस ।
फुलेल ही हिरवळ
नको निराश तू होऊस ।
येईल गंध या मातीला
भिजेल चिंब ही धरा ।
सूर्यही लपेल ढगाआड
होईल धुंद तो वारा ।
सागरात उफाळतील लाटा
निघेल न्हाऊन किनारा ।
पुसतील साऱ्याच वाटा
जीवन फुलण्याचा इशारा ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment