नैसर्गिक ऊर्जेचे प्रमूख तीन स्रोत आहे प्रकाश , वायू आणि जल
या तिन्ही स्त्रोतांची उपलब्धता अगदी मुबलक प्रमाणात आणि निशुल्क स्वरूपात आहे .
आजही आपण या तीन स्रोतांचा वापर आपल्या जीवनात करून घेऊन काही अंशी ऊर्जेची गरज भागवत आहोत पण तरीही ही ऊर्जा कितीतरी पटीने रोज वाया पण जात आहे, याचा पूर्ण पणे आपण उपयोगच करत नाही , आणि खनिज संपदा आणि पैसा लावून आपण इतर प्रकारांनी ऊर्जा मिळवून ती वापरात घेत आहोत. हे खरंच आपलेच दुर्दैव्य आहे.
या दृष्टीने संशोधने ही खूप झालीत, अजूनही चालू आहेत, पण ती तितकीशी पुरेशी नाहीत, आज शाळा कॉलेज मध्ये मुलांना त्या दृष्टीने शिक्षण देऊन त्यांची वैचारिक शक्ती जर वाढविण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच यश मिळायला वेळ लागणार नाही आणि आपल्याकडे तशी प्रयत्न करणारी एक सहा शोधकांची पूर्ण टीम तयार होईल
शासनाने त्या दृष्टीने नक्की प्रयत्न करायला हवेत
पूर्वी हे नैसर्गिक उपाय वापरून केलेले प्रयोग म्हणजे, सूर्य चूल, सोलर वॉटर हिटर, पान चक्की, पवन चक्की,सोलर पावर , हायड्रो पावर, विंड पावर, इत्यादी अनेक प्रकारे आपण प्रयत्न केलेत.यात यशही लाभले, पण अजून संशोधनाची गरज आहे
त्यातून नक्कीच यशोगाथा लिहिली जाऊ शकते,
धन्यवाद
संजय रोंघे
नागपूर
No comments:
Post a Comment