वाद विवाद हे सरले आता
दाहशतीची सुरुवात आता ।
रक्ताची या किंमत काय
नको कुणाला साथ आता ।
छिन्न विच्छिन्न भग्न झाली
माणुसकीची जात आता ।
आचार विचार पेटून उठले
धडधड जळते आग आता ।
धर्म संस्कृती जळून गेली
उरली फक्त राख आता ।
माणूस माणूस उरला कुठेहो
रक्तात भिजले हात आता ।
चला निघू या सारेच आपण
गीत अंताचे गात आता ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment