ऊन असते खायला
थंडी थोडी प्यायला ।
गर्मी व्हायला
आणि हवा द्यायला ।
नको बाकी काहीच
वेळ होतो जायला ।
शिव्या द्यायच्या तर
म्हणा च्या आयलां ।
सुंदर असेल दिसायचं
तर या फक्त पाहायला ।
गालावर दिसेल खळी
येईल मग हसायला ।
Sanjay R.
मन होते अधीर
नजर भिर भिर ।
माझे माझे करी
ठेव थोडा धीर ।
लढाईत सैनिक सारे
सारेच इथे वीर ।
जगण्याची ही लढाई
चल करू नको उशीर ।
Sanjay R.
आरंभ तिथे अंत
आहेच कोण कोण निवांत ।
मार्ग सत्याचा हवा
विचार साऱ्यांनाच अनंत ।
जगा आणि जगू द्या
मनात नसेल कुठली खंत ।
Sanjay R.
ते गावाच्या अगदी बाहेर
निर्जन जागी ऐक घर ।
आजूबाजूला दाट जंगल
होता रात्रीचा तो प्रहर ।
अमावस्येची रात्र काळी
वातावरणात वेगळाच स्वर ।
मधेच फडफड पाखरांची
वाटले मज यतोय कोणी अधर ।
काळी ती छावि लोंबता झगा
हसण्याचा आवाजात जोर ।
अंग माझे मग कापू लागले
आभास की स्वप्नाचा असर ।
Sanjay R.
भूत मनातली भीती
घाबरतात सारे किती ।
अमवसेला येतात म्हणे
का असते तीच तिथी ।
भूत म्हणजे निव्वळ भ्रम
नकोच ते शोधण्याचे श्रम ।
विचारांनी च लागतो रोग
जातो त्यातमाणसाचा दम ।
Sanjay R.