मन झाले सैरभैर
सावरू कसे मी त्यास ।
सुचेना मज काही
सदा असे तुझा ध्यास ।
मनात एकच आस
त्यातही आहे विश्वास ।
बरसतील सरी आणि
भिजतील चिंब श्वास ।
नको सावरू तू मन
नको आवरू तू तन ।
चल जाऊ दूर कुठे
तिथे घालवू दोन क्षण ।
Sanjay R.
मन झाले सैरभैर
सावरू कसे मी त्यास ।
सुचेना मज काही
सदा असे तुझा ध्यास ।
मनात एकच आस
त्यातही आहे विश्वास ।
बरसतील सरी आणि
भिजतील चिंब श्वास ।
नको सावरू तू मन
नको आवरू तू तन ।
चल जाऊ दूर कुठे
तिथे घालवू दोन क्षण ।
Sanjay R.
अथांग सागरात निघाली
नाव ही जीवनाची ।
नाही ठाउक किनारा
ओढली चादर आकाशाची ।
नकळे मी जाऊ कुठे
मावळल्या साऱ्या आशा ।
सूर्य होता सोबतीला
ठरवली त्यानेच दिशा ।
सूर्य मावळता आकाश्यातून
लागला चन्द्र दिसाया ।
चांदण्यांनी दिली वाट
लागलो मीही हसाया ।
पहाटेला लागला किनारा
होता गार गार वारा ।
पक्षांची झाली किलबिल
आला सूर्य होऊन तारा ।
Sanjay R.
जीवनाच्या वाटेवर
किती इथे प्रवासी ।
जगताहेत सारेच
काही त्यात हौसी ।
सुख असो वा दुःख
कुणी सदा रडतो ।
कुणी अडखळून
वाटेतच पडतो ।
काटेकुटे दगड धोंडे
वाट आहे कठीण ।
हसत हसत करू पार
येईल कशाला शीण ।
लोभ नको मोह नको
करतात आम्हा दिन ।
बघा एकदा करून
माणूसच हवा लिन ।
Sanjay R.
बांधली तू गाठ जशी
जीवनात माझ्याशी ।
सोडू नकोस आता
भांडलो जरी तुझ्याशी ।
घरातली भांडी जशी
आवाज तर करतातच ।
तुझ्या माझ्यातला वाद
असू दे तेवढ्या पुरताच ।
सदा असाच फुलू दे
नात्याचा हा रेशमी बंध ।
निघेल उजळून घर सारे
दरवळेल प्रेमाचा सुगंध ।
Sanjay R.
नशिबाने बांधली
दारिद्र्याशी गाठ ।
सुटता सुटेना
दिसेना वाट ।
गरिबीचा गुंता हा
गुरफटलो त्यात ।
कामासाठी सांगा
का पडतात हात ।
दिवसभर गळतो घाम
तरीही होतो घात ।
कष्टाचे होते पाणी
नाही कशाची साथ ।
Sanjay R.