अथांग सागरात निघाली
नाव ही जीवनाची ।
नाही ठाउक किनारा
ओढली चादर आकाशाची ।
नकळे मी जाऊ कुठे
मावळल्या साऱ्या आशा ।
सूर्य होता सोबतीला
ठरवली त्यानेच दिशा ।
सूर्य मावळता आकाश्यातून
लागला चन्द्र दिसाया ।
चांदण्यांनी दिली वाट
लागलो मीही हसाया ।
पहाटेला लागला किनारा
होता गार गार वारा ।
पक्षांची झाली किलबिल
आला सूर्य होऊन तारा ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment