बांधली ही गाठ आहे
नाही आता कुठे वाट ।
प्रवास आहे हा दूरचा
चालायचे हाच परिपाठ ।
कठीण हा मार्ग कीती
विचारही नको आता ।
संकटांशी सामना
चल करू जाता जाता ।
दुखःविना सुख नाही
सुखाची ही वाट नाही ।
आटू दे अश्रू सारेच
अंत तोही किती पाही ।
बघूनच प्रण माझा
विचारात तोही जाईल ।
माझ्याविना सांग तू
सुखात तो कसा राहील ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment