सत्याचा होतो विजय
असत्याने काय हासील ।
स्वातंत्र्याचा जिंकला लढा
अहिंसेचा मार्ग सुशील ।
अस्पृश्यतेचा सोडा विचार
स्वावलंबी सारे व्हा तुम्ही ।
प्रेम देऊनीया प्रेम घ्या
मंत्र बापूंचा पाळू आम्ही ।
स्वदेशीचा करा स्वीकार
विदेशील देऊन नकार ।
आत्मविश्वास जाणा जरा
होऊ नका असे लाचार ।
ऑक्टोबरची तारीख दोन
स्मरण करू आज बापूंचे ।
स्वातंत्र्याचे रक्षण करुनी
नमन करू त्या वीरांचे ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment