कळेल जेव्हा जीवनाचा अर्थ
होईल तेव्हाच जीवन सार्थ ।
हवेत विचार सर्वस्वी निस्वार्थ
थोडा तर हवाच हो परमार्थ ।
अंधश्रद्धेला तर नाहीच अर्थ
पिउच नका हो तसले तीर्थ ।
Sanjay R.
अर्जुन झाला दुःखी
युद्धभूमीवर होता नाद ।
कृष्ण सारथी पार्थाचा
ऐकेना कुणाची साद ।
अर्जुनास सांगुन गीता
कर्तव्याची दिली याद ।
झाले मग महायुद्ध
शंभर कौरव झाले बाद ।
झाला अन्यायाचा पराजय
सत्याची विजयी दाद ।
Sanjay R.