कशास म्हणू मी खेळ
सांगून येते कुठे वेळ ।
नियतीस जे मान्य
घडतो तसाच मेळ ।
चालेना कुणाचे काही
होतो मनाचा छळ ।
घडते तेच सार
असते ते अटळ ।
Sanjay R.
कशास म्हणू मी खेळ
सांगून येते कुठे वेळ ।
नियतीस जे मान्य
घडतो तसाच मेळ ।
चालेना कुणाचे काही
होतो मनाचा छळ ।
घडते तेच सार
असते ते अटळ ।
Sanjay R.
नियती ठरवते सारे
मनाचे कुठे चालते ।
कितीही ठरवा तुम्ही
व्हायचे तेच होते ।
म्हणतो मी मी कोणी
काय त्याचे उरते ।
सोडून जातो सारे
मित्व जेव्हा सरते ।
खेळ नियतीचा सारा
वेळ अचानक येते ।
असेल नसेल सारे
प्रवाहात घेऊन जाते ।
Sanjay R.
होते किती चिडचिड
आली नाही ती तर ।
डोंगर कष्टाचा समोर
आठवते माहेर सासर ।
चंदा आसो वा मंदा
आवरते पसारा सारा ।
नाही आली तर मात्र
म्याडमचा भडकतो पारा ।
घरात सारे असतात चूप
कळतो साऱ्यांना इशारा ।
कामवाली नसली तर
घरात वाजतात बारा ।
Sanjay R.
संघर्षाची वात पेटली
विझेल कशी ही आग ।
नको विसरू माणुसकी
जाग माणसा तू जाग ।
रक्ताची रे चटक तुझी ही
किती तुझा हा राग ।
डोळ्यातले ते अश्रू बघ
जरा माणसासारखा वाग ।
नाती गोती का विसरला
झालास विषारी नाग ।
भोगशील सारे तुही कधीरे
जाग जरासा जाग ।
Sanjay R.
जुने जाऊन नेहमी
मिरवत नवे येते ।
टिकत नाही नवे
परत जुनेच येते ।
म्हणतात ना
नव्याचे नऊ दिवस ।
आणि जुन्यालाच
घालायचा नवस ।
जुने ते सोने
कोणी काही म्हणे ।
यायचेच आहे तिला
ती परत येतेय ।
Sanjay R.