मनच झाले हे वादळ वारा
शमवू कसे कुठे किनारा ।
शांत करण्या हवा एकांत
सागर कधी का होतो शांत ।
लाटे वरती येईल लाट
नेई सारेच समुद्र अफाट ।
हवी मजला थोडी शांती
मिळेल केव्हा जळते पणती ।
Sanjay R.
मनच झाले हे वादळ वारा
शमवू कसे कुठे किनारा ।
शांत करण्या हवा एकांत
सागर कधी का होतो शांत ।
लाटे वरती येईल लाट
नेई सारेच समुद्र अफाट ।
हवी मजला थोडी शांती
मिळेल केव्हा जळते पणती ।
Sanjay R.
विचारांची होते गर्दी
मोजू कसे त्यात दर्दी
पडतात मग स्वप्न सारे
जातो विसरून ती अर्धी ।
सांगू कुणास खरेखोटे
देऊ कुणास मीही वर्दी ।
पाश सारे गुंतले पायात
जीवनाची ही वाट अर्धी ।
उरले सुरले मनात सारे
सोसवत नाही अफाट गर्दी ।
Sanjay R.
होतील कशी पूर्ण
स्वप्न या मनातली ।
निशे सवे जातील दूर
सत्यकथा आयुष्यतली ।
तळपतो जरी सूर्य
काय जादू ढगातली ।
धो धो पडतो पाऊस
शक्ती सांगा कुणातली ।
नको गर्दी अपेक्षांची
धुळमाती विचारतली ।
हसू खेळू थोडे आता
बघू गम्मत जीवनातली ।
Sanjay R.
नकोच वाटते सारे
करावे काय ते कळेना ।
मनात विचार असंख्य
डोक्यातून ते वळेना ।
करू किती विचार
वेळही कशी टळेना ।
शून्यात लागली नजर
डोळेही आता ढळेना ।
पाठलाग करते मन
आग हृदयातली जळेना ।
मांडला मी हा खेळ
छळ म्हणता छळेना ।
जाऊ कुठे सांगू कुणा
काहीच मज कळेना ।
Sanjay R.