शब्दांना हवी वाचा
नकोच ते मुके ।
होते विरळ सारे
नात्यातले धुके ।
शब्द करी अनर्थ
कधी कोणी चुके ।
शब्दांना हवी गोडी
नाते तिथेच टिके ।
शब्दांची किमया सारी
मग पाषाण ही झुके ।
जोडतो बंध मनाचा
दुःखही वाटे फिके ।
Sanjay R.
शब्दांना हवी वाचा
नकोच ते मुके ।
होते विरळ सारे
नात्यातले धुके ।
शब्द करी अनर्थ
कधी कोणी चुके ।
शब्दांना हवी गोडी
नाते तिथेच टिके ।
शब्दांची किमया सारी
मग पाषाण ही झुके ।
जोडतो बंध मनाचा
दुःखही वाटे फिके ।
Sanjay R.
भीती आम्हास कुणाची
वाटे आमच्याच मनाची ।
अंतरात दडून सारे
येते आठवण तयाची ।
भीती दाखवी कोणी कधी
दयनीय स्थिती हृदयाची ।
लागे मग सदा काळजी
मंद गती होई श्वासांची ।
नको दाखवू तू रे भीती
सावली तुजवर स्वार्थाची ।
निर्भय आम्ही झालो आता
भीती न उरली चरितार्थाची ।
Sanjay R.