Sunday, July 25, 2021

" भावनांचा होतो खेळ "

नको करुस विचार
भावनांचा होतो छळ ।

त्राण जातो सारा
उरतेच कुठे बळ ।

घडून जाते काही
असते काही अटळ ।

विचार करता काही
होते ना हळहळ ।
Sanjay R.


Saturday, July 24, 2021

" बंध अनोख्या नात्याचे "

शोधून कुठे मिळतील
बंध अनोख्या नात्याचे ।
जन्मोजन्मीचा तो धागा
ऋणानुबंध जीवनाचे ।

सुख असो वा असो दुःख
सोबत सदा असायचे ।
सावलीही सोडेल साथ
पण नाते कुठे तुटायचे ।

ठेवा हा जन्मोजन्मीचा
हळुवार त्यास जपायचे ।
होईल मग अजून घट्ट
त्यालाच नाते म्हणायचे ।
Sanjay R.

Friday, July 23, 2021

" होत नाही वारी "

वर्ष झाले दोन
होत नाही वारी ।
विठोबाचे भक्त
हिरमुसून घरी ।

दर्शनाची ओढ
माऊलीच्या दारी ।
दिस आले कसे
पडतात भारी ।

नामाचा जयघोष
नाही आता कानी ।
पावले जखडून
केले काय कोनी ।

क्षणोक्षणी विठ्ठल
येतो माझ्या ध्यानी ।
विचार नाही दुसरा
येत आता मनी ।

भिजले डोळे आता
किती येतील सरी ।
दर्शनाचा भुकेला
शोधतो दिशा चारी ।

दिसते स्वप्नात
विठोबाची पंढरी ।
मुखी घोष नामाचा
म्हणतो हरी हरी ।
Sanjay R.


" सवयीचा गुलाम "

माणूस गुलाम या सवयीचा
स्वस्थ कसा तो बसेल ।
शोध घेतो हवे मग त्याचा
जवळ ते जर नसेल ।
कशाचीच मग नसते परवा
सामना संकटाशीही करेल ।
हवे म्हणजे हवेच असते
म्हणतो तुझ्या विना मी मरेल ।
क्षणोक्षणी असे तोच विचार
काय आयुष्य असच सरेल ।
जीवनाचा तर रंगच न्यारा
कोण जिंकेल कोण हरेल ।
Sanjay R.



" कळलं कसं नाही "

काखेत कळसा गावाला वळसा

म्हण सांगते काही नाही ते खोटं ।

कळलं कसं नाही, जवळ होतं सारं
हाव किती मजला मन किती छोटं ।

असेल त्याला जपा, नको ते सारा
विचार हवा थोडा मन हवं मोठं ।
Sanjay R.