जाऊ नकोस दूर
मन माझे आतुर
गुंजतो कानात सूर
झरे आसवांचा पूर
का झालास फितूर
हृदय झाले चुरचुर
नको होऊस क्रूर
अंतरात रे तूच
जाऊ नकोस दूर
Sanjay R.

जाऊ नकोस दूर
मन माझे आतुर
गुंजतो कानात सूर
झरे आसवांचा पूर
का झालास फितूर
हृदय झाले चुरचुर
नको होऊस क्रूर
अंतरात रे तूच
जाऊ नकोस दूर
Sanjay R.
कान अधीर
डोळे भिरभिर ।
श्वास थांबले
सुटला धीर ।
शब्द सुचेना
मन अस्थिर ।
सांज ढळली
झाला उशीर ।
रात किडेही
करती किरकिर ।
काळोखात ती
पडकी विहीर ।
कुणी हसले
सुटले तिर ।
स्वप्न सरले
मिटली लकीर ।
Sanjay R.
ही कशी हो
लोकशाही ।
हसताहेत सारे
दिशा दाही ।
हरले जिंकले
पुढारी काही ।
बहुमत मात्र
कुणालाच नाही ।
खुर्ची साठी
त्राही त्राही ।
सत्ते साठी
स्वप्न पाही ।
कुणी सारतो
शर्टाची बाही ।
बोलतो दुसर्यास
नाही नाही ।
नीतीमत्ता तर
धारा शाई ।
लोक शाहीला
जीवच नाही ।
Sanjay R.
मनातलं खुप सारं
मनातच असू द्या ।
गालावर फक्त
हास्य दिसू द्या ।
डोळ्यातली आसवं
डोळ्यातच असू द्या ।
आसवांची फुलं
डोळ्यातून गळू द्या ।
कान किती तीक्ष्ण
सारच त्यांना ऐकू द्या ।
चांगलं ते सोडून
बाकी सारं विसरू द्या ।
मुखी शब्दांचे भंडार
त्यांनाही थोडं हलू द्या ।
जिंकायचे असते मन
शब्द तशेच बोलू द्या ।
आभाळ विचारांच उरी
त्यालाही थोडं धावू द्या ।
गर्जनाऱ्या आभाळातून
बरसात सुखाची होऊ द्या ।
Sanjay R.
रे माणसा तूच रे बदलला
माणुसकी तर तूच विसरला ।
स्त्री तर होते माता, बहीण कुणाची
अर्धांगिनी ती आपूल्या पतीची ।
भार घराचा तीच उचलते
तिच्या विना रे पान न हलते ।
नाही अबला ती तर सबला
माया ममता ठाऊक तिजला ।
दुर्गा ती अनुसया ती
होते कधी तीच चण्डिका ।
घेऊनि तलवार रणांगणात ती
लढते येता प्रसंग बाका ।
पूजन करते जग सारेची
का विसरला तू माणसा ।
सन्मान हवा थोडा तिजला
मान देऊनी तू बघ जरासा ।
Sanjay R.