स्वप्न एक आमचे
भारत स्वच्छ ।
करायचे प्लास्टिक
इथून गच्छ ।
प्लास्टिकचे जीवनात
स्थानच उच्च ।
मग प्लास्टिक
आहे कुठे तुच्छ ।
शोधा पर्याय
कुठला तरी अच्छा ।
मगच सांगा.......
प्लास्टिक सोडा
करा भारत स्वच्छ ।
Sanjay R.
स्वप्न एक आमचे
भारत स्वच्छ ।
करायचे प्लास्टिक
इथून गच्छ ।
प्लास्टिकचे जीवनात
स्थानच उच्च ।
मग प्लास्टिक
आहे कुठे तुच्छ ।
शोधा पर्याय
कुठला तरी अच्छा ।
मगच सांगा.......
प्लास्टिक सोडा
करा भारत स्वच्छ ।
Sanjay R.
झाले दहन रावणाचे
प्रतीक ते कुविचारांचे ।
धडे गिरवले संस्कारांचे
भूत मात्र तिरस्काराचे ।
माया सगळी धनाची
नाही ममता मनाची ।
विणतो जाळे स्वार्थाचे
काय कुणास कुणाचे ।
पाप पुण्य सारे सरले
मोह मत्सर फक्त उरले ।
देह इथले माणसाचे
होते दहन माणुसकीचे ।
Sanjay R.
दिवसा मागून दिवस जातात
मनाला मनाचे कळत नाही ।
जाग येते सूर्याला आणि
तेव्हाच सुरुवात होते काही ।
आठवणींचा मोठ्ठा पसारा
सहजच येतो मग पुढ्यात ।
एकच थेंब पाणी कसे
वसते डोळ्याच्या घड्यात ।
अंतरातली जखम खोल
सहजच दुखावते कधी ।
वाहू लागते भळभळून
बांध मनाचा फुटतो आधी ।
Sanjay R.
झाला गाव सुना
पाखरांनो या ना पुन्हा
झाला गाव सुना ।
नाही कावळा नाही बगळा
चिऊला पण नाही दाना
झाला गाव सुना ।
झाडे झुडपे गेली खंगून
काय कुणाचा यात गुन्हा
झाला गाव सुना ।
लोपली हिरवळ सारी
नाही उरला गाव जुना
झाला गाव सुना ।
आटले पाणी नदीचे
येईल तिलाच पूर पुन्हा
झाला गाव सुना ।
घरटे तुटून राख झाले
गेला कुठे इथला कान्हा
झाला गाव सुना ।
माणूस माणूस नाही उरला
शोधते आई तिचा तान्हा
झाला गाव सुना ।
तुळस अंगणी वाट पाहते
वाकून गेल्या साऱ्या माना
झाला गाव सुना ।
भकास झाले सारे गाव
कुणीतरी हो परत याना
झाला गाव सुना ।
Sanjay R.