Saturday, May 18, 2019

" रे बळीराजा.... "

रे बळीराजा.....
सहनशक्ती तुझी सांग
किती आहे रे अपार ।
कळणार नाही कधीच तुला
त्या चाकूची रे धार ।
नाही ठाव अजब रे 
आहे हे सरकार ।
पोटावर तुझ्या होता
किती किती रे वार ।
सांग तूच आता तुला
आहे कुणाचा आधार ।
किती रे झेलशील तू
हे असलेच प्रहार ।
काळ्या मातीत राबतो
नाही तुज दिस वार।
घरात जगतात किती
सांग किती तुझा भार ।
पै पै लागतो मातीत
घेतो पाऊसच इसार।
सावकारापुढे कसा
होतोस तू लाचार ।
तिसरा मधेच कुणी येतो
करतो तुझा व्यापार ।
खिसा घेतो हिसकावून
आणि सरतात विचार ।
सांग ठणकावून जरा
तूच जगवतो सारा भार ।
नको रे सोसू असा
एकटाच सारे वार ।
फेक फंदा फाशीचा
दे घराला तू आधार ।
टाक उलटून आता
सरकारचा हा दरबार ।
जळून तू रे जळणार किती
राखे विना काय उरणार ।
टाक जाळून तू आता
पडू दे त्यांचेच निखार ।
Sanjay R.

Friday, May 17, 2019

" भावार्थ "

शब्द च तर भाव
सांगून जातात ।
बाकी काय असतं
आपल्या हातात ।

शब्दांची होते कविता
भावार्थ तिचा किती ।
हृदयात जेव्हा ठसते
भावना होते रीती ।

चार ओळींची चारोळी
नजरेतून जाते गळी ।
मन होते आनंदी
फुलवत गालावर खळी ।
Sanjay R.

" तू रणरागिणी "

तू स्वप्नपरी
सुन्दरी खरी ।
रूप गुण
तू मनोहारी ।
भासते मज
सुशांत विचारी ।
भूषण तूझेच
इंद्र दरबारी ।
लौकिक तुझा
दिशा चारी ।
रण रागिणी तू
आहे परोपकारी ।
संजय R.

Thursday, May 16, 2019

" तुझ्याच साठी "

तुझ्याच साठी सखे
असते माझी कविता ।
मनात भाव कितीक
करतो घडा रिता ।

पदो पदी क्षणो क्षणी
तू असतेस माझ्या मनात ।
शब्द होऊन अवतरतेस
झुलते मन क्षणात ।

शब्दांच्याही पलीकडे
लपल्या आहेत व्यथा ।
सांगू कसे तुला मी
अंता वीणा ती कथा ।

थांबवू नको तू हसणे
नको वाटे तुझे रुसणे ।
जीवन ही एक गाथा
हवे त्यात तुझे असणे ।
Sanjay R.

" अरमान "

ना भुले है कुछ
ना भुलेंगे कुछ  ।
है अरमान वही
दिलसे तो पुछ ।

बाते है वही
जो दिलने कही ।
आज भी है
दिलमे सही  ।

यादे अब वही
न भुलना कभी ।
दिल ही दिलका
है साथी अभी ।
Sanjay R.