सुरू झाला आता
गर्मीचा कहर ।
पाळासाला आला
फुलांचा बहर ।
तापून किती निघतय
गाव आणि शहर ।
कोरडे ठण ठण
नद्या आणि नहर ।
पाण्याविना होईल
आयुष्य जहर ।
Sanjay R.
Monday, March 18, 2019
" गर्मीचा कहर "
Friday, March 15, 2019
" दूर किती तू "
धडधडते हृदय माझे
सळसळतो वारा ।
होता आठवण तुझी
चमचमतो तारा ।
दूर किती तू आहेस
त्या पर्वतांच्या पल्याड ।
अंतरास मात्र वाटे
इथेच तू पापणीच्या अल्याड ।
रिमझिम रिमझिम होते जेव्हा
पावसाची बरसात ।
बेधुंद होऊन घेतो भिजून
हातात तुझाच हात ।
ठेवले मी डोळ्यात जपून
नजरेचे ते इशारे ।
वाटेवर तुझ्याच थांबले
माझे श्वास सारे ।
करू नकोस उशीर आता
प्राण माझे कंठाशी आले ।
जगेलं कसा तुझ्याविना मी
स्वप्न माझे तूच झाले ।
Sanjay R.
" आभास "
आठवण आली ना
की व्हायचे भास ।
अंतरातच मग थोडे
थांबायचे श्वास ।
आजही कशी मज
आली तुझी आठवण ।
मन झालं थोडं अधीर
जीव झाला कण कण ।
उचकीने मांडला उच्छाद
कानांनी घेतली साद ।
नजर झाली भिर भिर
वाटले व्हावा थोडा संवाद ।
मनात तुझाच ध्यास
नव्हते काहीच लक्षात ।
स्वप्नच अवतरले जणू
पुढ्यात तूच साक्षात ।
बघितले तुझे लाजनें
गालात थोडे हसणे ।
नेत्रांचा तुझ्या दिवना
रूप तुझे किती देखणे ।
सुखावून गेला तो क्षण
भान माझे हरपले ।
फुल गुलाबाचे जणू
मी हृदयात माझ्या जपले ।
Sanjay R.
Wednesday, March 13, 2019
" निवडणूक 2019 "
आली आली
निवडणूक आली ।
राजनेत्यांची धावपळ
सुरू झाली ।
हुशार किती हे नेते
वाटे मतदार सारे मूर्ख ।
खरे खोटे सारेच ठाव
फेकतात काढून सारा अर्क ।
होळी यांची झाली सुरू
माखून जातील चिखलात सारे ।
इलेक्शन म्हणजे सावळा गोंधळ
भिनले अंगात वारे ।
बेशरमकीची करतील हद्द
जिवंतपणीच घालतील श्राद्ध ।
मान सन्मान तुडवत पायी
बरबटलेले सारेच दाखवतील शुद्ध ।
दगडास लावतील शेंदूर
टाकून तेल चपा चप ।
मांडून दगड होतील फरार
लुटतील देश मग झपा झप ।
Sanjay R.
Friday, March 8, 2019
" करू किती गुण गान "
कोमळ मनाचे पान
आहेस किती छान ।
घराची तू आन
तूच कुटुंबाची शान ।
सागरा इतके ज्ञान
कर्तृत्वात विज्ञान ।
आई ची माया
बहिणीची छाया ।
अर्धांगिनीचे आहे
तुजला किती भान ।
अंबा तू जगदंबा तू
देवतेचे तूच निशाण ।
झाशीची राणी तू
कृष्णाची राधा तू ।
विचारांची तू खाण ।
किर्ती तुझीच महान ।
रूप तुझे गं हजार
करू किती मी गुणगान ।
वंदन करतो तुज पूजितो
तूच आमुचा सन्मान ।
Sanjay R.