धडधडते हृदय माझे
सळसळतो वारा ।
होता आठवण तुझी
चमचमतो तारा ।
दूर किती तू आहेस
त्या पर्वतांच्या पल्याड ।
अंतरास मात्र वाटे
इथेच तू पापणीच्या अल्याड ।
रिमझिम रिमझिम होते जेव्हा
पावसाची बरसात ।
बेधुंद होऊन घेतो भिजून
हातात तुझाच हात ।
ठेवले मी डोळ्यात जपून
नजरेचे ते इशारे ।
वाटेवर तुझ्याच थांबले
माझे श्वास सारे ।
करू नकोस उशीर आता
प्राण माझे कंठाशी आले ।
जगेलं कसा तुझ्याविना मी
स्वप्न माझे तूच झाले ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment