रहेंगे उम्रभर आपके ।
वक्त तो रुकता कहा
जिते है यादोमे आपके ।
हो तुम वहा ।
रखं लु दिलमे
लगे मेरा सारा जहा ।
Sanjay R.
गाव माह्या वर्धा
हाये वयखीचा अर्धा ।
इचरतेत एकमेकाले
काय रे मरदा ।
उलीसाच हाये
खात का जरदा ।
इचार गांधीजींचे
दोस्तीत न्हाई स्पर्धा ।
पितेत सारेच
लावून परदा ।
बंदी हाये ना
पर घेतीन चारदा ।
बेस्टच हाये
गाव माह्य वर्धा ।
Sanjay R.
सांगू कसे मी गं तुला
अंतरीच्या माझ्या फुला ।
हलकेच तुझ्या उडतात बटा
जिवाच्या माझ्या होतात छटा ।
ओठ मज का तुझे पुकारती
पेटतात बघ हृदयात वाती ।
नेत्रात सांगू भाव कुठले
मनात माझ्या वादळ उठले ।
सळसळ यावा वादळ वारा
सोबत प्रेमाच्या चिंब धारा ।
वाटे तू अशीच सदा हसावी
आठवण मज तुझीच व्हावी ।
राधा राधा चाले मनात धावा
कृष्ण फुंकतो आपुला पावा ।
श्वासांची बघ गती वाढली
उचकी मज का तूच धाडली ।
ये ना सखे तू जवळ माझ्या
घेतो विसावा अंतरात तुझ्या ।
Sanjay R.
नाही हा दहशतवाद
हे तर आहे आक्रमण ।
भ्याडांनी केला हल्ला
यात कुठला पराक्रम ।
घरात घुसून मारा आता
वाट कुठवर बघणार आपण ।
Sanjay R.
घालावू कसा
सांग राग तुझा ।
मैत्रीचा हा धागा
बांध ना माझा ।
Sanjay R.
बघू दे मला गालावर
हास्याची एक छटा ।
वाटत सतत तू हसावं
जशा सागराच्या लाटा ।
चल जाऊ या दूर तिथे
जिथे हास्यनगरीच्या वाटा ।
Sanjay R.
हात लिया जब
हमने दोस्तीका ।
बस मूड होता है
उनसे मस्तिका ।
Sanjay R.