गेलेत हो ते दिवस
आलोय मी कुठे ।
परत नाही येणार
दिवस तेच इथे ।
हसणे रडणे खेळणे
दिवसभर भटकणे ।
मोठा मी झालो ना
दिवस होते ते जुने ।
आईचा तो मार
बाबांचा होता धाक ।
भ्यायचो ना किती
ऐकताच ती हाक ।
शाळा असो वा घर
मस्ती करायची खूप ।
वरण भातावर वाढे
आईच जास्त तूप ।
हवे ते मिळायचे
चिंता नव्हती कशाची ।
बाबाही किती झटायचे
नसे काळजी खिशाची ।
पावसात मस्त भिजायचो
उन्हा तान्हात खेळायचो ।
मित्रांसोबत आम्ही तेव्हा
पेरुही कसे चोरायचो ।
सारच संपलं आता
उरल्या फक्त आठवणी ।
किती छान होती ना
आजीची ती कहाणी ।
खूप वाटत मनाला
हवे परत तेच दिवस ।
सांगा ना कोणी मला
करू कुणाला नवस ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment