Wednesday, July 24, 2024

मन

मन किती हे भारी
कधी अंतरात कधी ते दारी ।
कधी हिरमुसते
कधी येई फिरून दिशा चारी ।

सुख असो वा दुःख
आतल्या आत चाले मारा मारी ।
क्षणात सारून सारे
भाव बदलाची करे कशी हुशारी ।

संकटाचे येता वादळ
सहजच कसे ते होते  विचारी ।
शांती वाटे हवी तेव्हा
होते संथ किती ते  निराकरी ।
Sanjay R.


No comments: