नको त्या आठवणी
नको ते विचार ।
वाळूचे घर बांधले
लाटेपुढे होते लाचार ।
जिकडे तिकडे पाणीच पाणी
नाही कशाचाच आधार ।
सतत पडतोय हा पाऊस
सोबत डोळ्यांनाही धार ।
घराला तर छत नाही
उरल्या कुठे भिंती चार ।
शेतात नुसतेच पाणी
डोक्यावर कर्जाचा भार ।
तापाने नुसता फणफणतो
अंग ही पडले गार ।
हसू कसा रडू कसा
जीवनाचा तर हाच सार ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment