कुठे थांबते ही वाट
एकदा होताच गाठ ।
वळणा वरून फिरते
सुटेना क्षणभर पाठ ।
लगबग ज्याची किती
सोडवेना कधी काठ ।
परतते आली जशी
जणू सागराची लाट ।
आठवण सुटता सुटेना
हृदयात रुतून दाट ।
रात्र निघते जागून
केव्हा होईल पहाट ।
हरपते भान सारे
विचार होतात सैराट ।
नकळत वळती पाऊले
सुखावते प्रेमाची वाट ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment