एकच ही पाऊलवाट
होतात पावले भारी ।
फिरत राहतो सारखा
हरवलो दिशा चारी ।
नागमोडी वळणं त्यात
नको वाटतात सारी ।
सम्पता कधी सम्पेना
कठीण जीवनाची वारी ।
बघतो वळून मागे जेव्हा
येते डोळ्याला अंधारी ।
पुढे पुढे मी जाऊ कुठे
करी दंश साप विषारी ।
चालवेना आता थकलो
विसावा हवा थोडा तरी ।
थांबतील हे श्वास कुठे
सम्पेल का केव्हा तरी ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment