मनाला कुठले सुख
त्याला तर असते हाव ।
हे हवे ते हवे सारेच हवे
सुरू असते धावाधाव ।
कधी म्हणतो देवाला
एकदा मला पाव ।
पावलाच कधी तर
घेत नाही परत नाव ।
आयुष्य जाते असच
नुसता जीवाला काव ।
सरते शेवटी मात्र मग
बसतो कुरवाळत घाव ।
कधी सुख कधी दुःख
हेच जीवनाचे नाव ।
वेळ काढून थोडा
जीवाला जीव लाव ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment