यवतमाळ साहित्य मंच द्वारा आयोजित काव्य स्पर्धेत माझ्या नाती गोती या कवितेची निवड, आयोजकांचे खूप खूप आभार .
" नाती गोती "
आयुष्याचे मोल काय
अजून का हे कळले नाय ।
लुटारूंचा बोल बाला
भोगवाद्यांचा अजब न्याय ।
कष्टकऱ्यांचे आटते रक्त
सहन करतो सारे अन्याय ।
अधांतरीच स्वप्न सारी
जसे वाळूवरती उभे पाय ।
लाट येताच पाण्याची
कण कण वाळू निघून जाय ।
नाती गोती सरती सारी
नसती सोबत बाप माय ।
स्वाहा होते नश्वर शरीर
राख उरते किंमत काय ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment