Tuesday, October 13, 2020

" कवितेची निवड "

यवतमाळ साहित्य मंच द्वारा आयोजित काव्य स्पर्धेत माझ्या नाती गोती या कवितेची निवड, आयोजकांचे खूप खूप आभार .

" नाती गोती "

आयुष्याचे मोल काय
अजून का हे कळले नाय ।

लुटारूंचा बोल बाला
भोगवाद्यांचा अजब न्याय ।

कष्टकऱ्यांचे आटते रक्त
सहन करतो सारे अन्याय ।

अधांतरीच स्वप्न सारी
जसे वाळूवरती उभे पाय ।

लाट येताच पाण्याची
कण कण वाळू निघून जाय ।

नाती गोती सरती सारी
नसती सोबत बाप माय ।

स्वाहा होते नश्वर शरीर
राख उरते किंमत काय ।
Sanjay R.

No comments: