असेल नातं हळवं
पण आहे ते दृढ ।
मनात असते तगमग
पण नसतो त्यात सूड ।
घेतो मी सांभाळून
वार कितीही झाले ।
विसरायला काय लागतं
चुकते कधी आपले ।
चुकभुल देणे घेणे
दोन बाजूंचे नाणे ।
संसार हा असाच
गातो कधी रडगाणे ।
प्रेमाला कुठला बंध
विचारच होतात बेधुंद ।
क्षण दुखाचाही येतो
शोधू त्यातही आनंद ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment