निघतो रथ संसाराचा
त्याला असती चाके दोन ।
चाले रथ रोज पुढे पुढे
खाच खळगे कुठे कोण ।
लक्ष असते जीवनाचे
विश्वास असतो विजयाचा ।
जय पराजय बाजू अनेक
उत्सव होतो आनंदाचा ।
डोकावून जाते दुःख कधी
विचार त्याचा नसतो मनी ।
प्रयत्नांची मग होते शर्थ
दूर होतात सारे शनी ।
फुलते मग बाग फुलांची
पाखरं होती दोन पक्षांची ।
दिवसामागून दिवस जाती
अविरत चाले चाकं रथाची ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment