Tuesday, May 5, 2020

" मला तर वाटतं "

काय दिवस आलेत कळतच नाही.
चुकी कोण करतो आणि भोगतो कोण.
कशाचा काशाशीच संबंध नाही .

सगळेच बसले आहेत घरात.


भीती मरणाची इच्छा जगण्याची आहे ना यामागे .
जीवनाचाच हो खेळ झाला .
माहीत नाही जायचा कुणाचा आता वेळ झाला .
तरीही आशा आहे भविष्याची.
आस आहे जगण्याची .
इच्छा आहे काही करण्याची.
नियतीचा आहे हा खेळ .
जगणे मरणे त्याच्या हाती.
मलाच मी बघतो आता माझ्यासाठी.
दूरवर दिवा ना अजूनही जळतोय.
सांगतोय.....
मी विझणार नाही ....
आणी विझलो तरीही  पहाटेला सूर्य उगवणार आहेच
परत प्रकाशाची किरणं घेऊन...
आणी सर्व प्रकाशमान होणार आहे.
जीवन हे असेच चालणार आहे.
आम्ही सारे या जीवनाचे स्तंभ आहोत.
आम्हीही जगणार आहोत जगवणार आहोत.
Sanjay R.


No comments: