दिवस गेला एक एक
सरलेत किती वर्ष ।
होतो मी लहान जेव्हा
मोठे व्हायचे आकर्षण ।
वाटायचं होऊ दे मोठं
जगील मी मनसोक्त ।
रागवणार नाहीत कोणी
करील वाटेल ते मस्त ।
मोठा झालो सारंच जगलो
आठवतो मी जुने दिवस ।
वाटतं हवेत परत तेच
बालपणाचे दिवस सरस ।
हसणं ते रडणं ते दूर झालं
हरवली ती मजा मस्ती ।
मिळणार नाही परत कधीच
चालायची जी कट्टी दोस्ती ।
खेळ दंगा व्हायचा पंगा
रोज असायचा नवा दिवस ।
सारंच सम्पलं, घरात आता
हरवलं बालपण, मन नर्व्हस ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment