येताच महिना मे
परीक्षांना होतो विराम ।
मुलं होतात फ्री
मिळतो थोडा आराम ।
दरवर्षीप्रमाणेच
सहलीचा होता प्लान ।
परीक्षाच गेली वाया
व्यक्त कुठे झाले ज्ञान ।
वेळ चालला घरात
नाही कशाचेच भान ।
सहलीचा वाजला बाजा
उदास झालेत लहान ।
नाही शाळा नाही खेळ
होते चिडचिड मन ।
घरात आता बसू किती
जड जातोय एक एक क्षण ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment