काय आलेत दिवस
झाली कशी अवस्था ।
मुलं मुली गेलेत दूर
डोळे पाहताहेत रस्ता ।
हात पाय थकलेत आता
थरथरते अंग, वाटते भीती ।
म्हातारे झालेत डोळे
आसवही गळणार किती ।
कान अधू डोळे अधू
नाही कुणाची साथ ।
विसरू नको देवा मला
तुझाच रे मदतीला हात ।
आठवणींचा डोंगर उलटतो
होते विचारातच पहाट ।
नकोच वाटतो सूर्योदय
शोधतो अंधारातच वाट ।
Sanjay R.
झाली कशी अवस्था ।
मुलं मुली गेलेत दूर
डोळे पाहताहेत रस्ता ।
हात पाय थकलेत आता
थरथरते अंग, वाटते भीती ।
म्हातारे झालेत डोळे
आसवही गळणार किती ।
कान अधू डोळे अधू
नाही कुणाची साथ ।
विसरू नको देवा मला
तुझाच रे मदतीला हात ।
आठवणींचा डोंगर उलटतो
होते विचारातच पहाट ।
नकोच वाटतो सूर्योदय
शोधतो अंधारातच वाट ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment