आता लेखणी नकोच
हवा एक खडु ।
विसरा म्हणावं सारं
संपलय सारं रडू ।
का लेखता तुम्ही
स्त्रीस इतके कमी ।
सरला तो काळ
आज बरोबरीची हमी ।
का विसरलेत सारे
ती झासीची राणी ।
लढते तशिच आजही
पुसुन डोळ्यातले पाणी ।
संसाराचा ओढुन गाडा
घरास देई घरपण ।
नका पाहु अंत तिचा
होइल तुमचेच सरपण ।
सार्या जगाची माता ती
प्रेमळ तिचेच मन ।
फिटणार नाही जन्मात या
कधी मोजलेस का ते रुण ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment