समज वा नासमज
सगळाच गैर समज ।
समजवायचे किती
असो वा नसो गरज ।
तुटलेले हे मन असे
जुळेल का खरंच ।
धाग्याला धागा जुळतो
स्वच्छ असे मन तरच ।
नको राग नको लोभ
मोह माया ठेवा दूरच ।
मनाशी मन जुळवा
मी मी सोडाल तरच ।
Sanjay R.
भाव भक्तीचा मार्ग
नेईल तिथेच स्वर्ग ।
मिटून दोन डोळे
चरणी लीन होतो ।
रूप तुझे आठवतो
मनी मी साठवतो ।
न उरते आशा मग
धन्य मनात होतो ।
राग लोभ मत्सर
सारेच ते दुराचार ।
लोप होतो तयाचा
भार सारा सरतो ।
दीन दुःखी गरीब
सारे माझ्या करीब ।
मीही दास प्रभूचा
भाव भक्तीत पाहतो
Sanjay R.