डोक्यात विचारांचे जाळे
छळतात किती मनाला ।
सारे असते सोसायचे
सांगायचे कसे कुणाला ।
वाटे कधी काय करावे
दुःख आतले कसे सारावे ।
सोडून साऱ्या दुःखाच्या वाटा
वाटेत सुख तेच धरावे ।
Sanjay R.
डोक्यात विचारांचे जाळे
छळतात किती मनाला ।
सारे असते सोसायचे
सांगायचे कसे कुणाला ।
वाटे कधी काय करावे
दुःख आतले कसे सारावे ।
सोडून साऱ्या दुःखाच्या वाटा
वाटेत सुख तेच धरावे ।
Sanjay R.
सुंदर मनाची असते आई
करते लहान पणी गाई गाई ।
जगात असते रात्र सारी
तानुल्या रे ती तुझ्या पाई ।
कंटाळा का कधी केला तिने
मन तिचे रे तुझ्याच ठाई ।
ओठी तिच्या नव्हता शब्द
कधी बोलली का तुला नाही ।
मोठा तू रे झालास आता
आठव जरा ती तुझी आई ।
लोटू नकोस दूर असे तू
सांग कशाची पडली घाई ।
Sanjay R.
असावे एक सुंदर मन
गुंतून जावा क्षण क्षण ।
कधी घ्यावी उंच भरारी
यावे फिरून सारे गगन ।
आहे बघायचे सुंदर तारे
ठेवून उघडे दोन नयन ।
ढगावरती होऊन स्वार
आहे करायचे मज भ्रमण ।
Sanjay R.
मनातले कळणे
आहे किती कठीण ।
व्हायचे तेच घडते
नियती पुढे सारे क्षीण ।
हाताशी आलेला घास
जातो कधी निसटून ।
नकळत मिळते कधी
नशीब आणते ओढून ।
सारा नियतीचा खेळ
नशिबाची हवी साथ ।
असेच काही मिळत नाही
मेहनतीचाही हवा हात ।
Sanjay R.