सुखाचे दिवस किती
दुःख कुणाच्या हाती ।
दिवसा मागून दिवस हे
सुख दुःख घेऊन येती ।
क्षण तर चारच प्रेमाचे
आहे तीच खरी प्रीती ।
आयुष्यभर जपू या
प्रेमाची हीच नाती ।
जीवनाची वाट ही
फक्त हात हवा हाती ।
जगायचे तर आहेच
हवी कशास भीती ।
Sanjay R.
सुखाचे दिवस किती
दुःख कुणाच्या हाती ।
दिवसा मागून दिवस हे
सुख दुःख घेऊन येती ।
क्षण तर चारच प्रेमाचे
आहे तीच खरी प्रीती ।
आयुष्यभर जपू या
प्रेमाची हीच नाती ।
जीवनाची वाट ही
फक्त हात हवा हाती ।
जगायचे तर आहेच
हवी कशास भीती ।
Sanjay R.
आयुष्य कुठे लहान
बघा करून महान ।
सगुणांची ती शान
त्यांचाच होतो मान ।
करावे तितके थोडे
करू या गुण गान ।
हवी तीच आन
नाहीतर मोकळे रान ।
स्वार्थ होतो जागा
आणि सुटते सारे भान ।
लागतो भोगावा मग
पदोपदी आपमान ।
उलटून बघा येकदा
आयुष्याचे पान ।
सुंदरतेनी भरलेले
असेल तितकेच छान ।
Sanjay R.
एक जुने पान
मळलेले चुरगळलेले ।
ऐक जुने पण
अगदी जीर्ण झालेले ।
कधी पडेल गळून
नाही भरोसा आता ।
सांगते खूप काही
अखेर जाता जाता ।
आयुष्यात येतो
ऊन पाऊस वारा ।
जुने जाऊन नवे येते
बदलतो हा पसारा ।
क्षण भंगुर हे जीवन
नाही भरोसा कशाचा ।
हसत पार पाडायचे
नियम आहे जगायचा ।
Sanjay R.
थकवा आला पाहा
हवा एक चहा ।
मैत्रीचा दुवा पाहा
बस एक चहा ।
पाहुणे आले घरी
त्यांना ही चहा ।
कंटाळा आला आता
फ्रेश होण्यास चहा ।
काहीच नाही करायला
चला पिऊ या चहा ।
Sanjay R.