नको काळजी नको चिंता
थोडे धैर्याने तुम्ही वागा ।
जीवन हे सुंदर किती
बिनधास्त तुम्ही जगा ।
मोह माया नकोच आता
धरू प्रेमाचा एकच धागा ।
सुख दुःख येतील जातील
करू नका कशाचा त्रागा ।
Sanjay R.
ये मेरा दिवाना पन था की
कळत नकळत सारे घडले ।
नशिबाचाच खेळ सारा
कळलेच नाही कोण कुठे पडले ।
सगळीच झाली पागल पंती
पता नहीं घोडे कुठे अडले ।
डोळ्यात नाही अश्रू
पण म्हणतात सगळेच रडले ।
कुणास ठाऊक कसे ते
मन माझे तिच्यावर जडले ।
Sanjay R.
कळत असो वा
असो नकळत ।
ऐकायचे फक्त
आता मनाचे ।
नको ते सोडून
हवे तेच बघायचे ।
सुख दुःख सोबती
आनंदात जगायचे ।
झाले गेले विसरून
फक्त हो हसायचे ।
Sanjay R.