नको वाटते मज
काय तुझी तऱ्हा ।
का उदास तू असा
बघ डोळ्यात जरा ।
भरून आभाळ इथे
मन मोकळा तू बरा ।
थेंब दोन गालावर
पुस डोळे रे जरा ।
सुख दुःख हे जीवन
आहे नशिबाचा फेरा ।
हसत होईल रे पार
तोड आता तू घेरा ।
Sanjay R.
नको वाटते मज
काय तुझी तऱ्हा ।
का उदास तू असा
बघ डोळ्यात जरा ।
भरून आभाळ इथे
मन मोकळा तू बरा ।
थेंब दोन गालावर
पुस डोळे रे जरा ।
सुख दुःख हे जीवन
आहे नशिबाचा फेरा ।
हसत होईल रे पार
तोड आता तू घेरा ।
Sanjay R.
भावनांचा सागर
सोबतीला विचार ।
शोधतो मी पार
काढू कसा सार ।
पेलवेना भार
प्रेम आहे आधार ।
मन हे बंद दार
सोसते कुठे हार ।
शब्दांनाही धार
पण नाही आकार ।
चुकतो जेव्हा उकार
सरतो तिथे होकार ।
अंतरा वरती मार
काळजात प्रहार ।
जीवनाची तार
थांबते मग सतार ।
Sanjay R.
तो आणि ती
गुंतले धागे सारे ।
नजरानजर झाली
आले प्रेमाचे वारे ।
ठेऊन असतो नजर
त्यात करतो इशारे ।
चोरून ती बघते
जणू स्टिंगचे कॅमेरे ।
गाठ भेट व्हावी आता
मोजतो मनात तारे ।
तिच्याही अंतरात तो
हवे हवे वाटे सारे ।
प्रेम गेले फुलत
तुटले सारे पहारे ।
झाले ऐक दोघे
साक्षीला चंद्र तारे ।
Sanjay R.
कठीण जीवन किती
अशा कशा या वाटा ।
नसेल जायचे तरीही
मिळतो मागून रेटा ।
सुख इथे कमी पण
भारी दुःखाचा पाटा ।
हृदय उरलेच कुठे हो
अंतरात सलतो काटा ।
Sanjay R.
सांग तू राजा
आहे रे कुठे मजा ।
सदा असतो धावत
वाटते मला सजा ।
गाव सुटले आणि
शहरी मी आलो ।
पैश्याची हाव आता
लालची किती झालो ।
रहायला रे खोली
हवे वाटते घर ।
गावच्या अंगणाची
नाही रे इथे सर ।
सकाळची बैठक
पळतो मी कुठे ।
घड्याळीच्या कट्यावर
सारे धावत सुटे ।
नाही क्षणाची उसंत
चाले दिवसभर काम ।
पूजा नाही पाती
विसरलो मी राम ।
काळ लोटला इथे
सूर्य बघितला कधी ।
ऊन वाऱ्याचा चटका
पाऊस रे गावा मधी ।
हिरवे रान कुठे
इमारतीचे झाले जंगल ।
आई बाप तिकडे
हीच मनात रे सल ।
शोधतो रोज मी
काळया मातीचा वास ।
उभ्या उभ्या कसा रे
थांबतो इथे श्वास ।
सांगतो मी राजा
याद गावाची येते ।
नाही माणुसकी इथे
काढून काळीज नेते ।
नको वाटते सारे
गाव होता रे बरा ।
कपटी सारेच इथे
हृदयात तिथेच झरा ।
Sanjay R.