नशिबाने बांधली
दारिद्र्याशी गाठ ।
सुटता सुटेना
दिसेना वाट ।
गरिबीचा गुंता हा
गुरफटलो त्यात ।
कामासाठी सांगा
का पडतात हात ।
दिवसभर गळतो घाम
तरीही होतो घात ।
कष्टाचे होते पाणी
नाही कशाची साथ ।
Sanjay R.
नशिबाने बांधली
दारिद्र्याशी गाठ ।
सुटता सुटेना
दिसेना वाट ।
गरिबीचा गुंता हा
गुरफटलो त्यात ।
कामासाठी सांगा
का पडतात हात ।
दिवसभर गळतो घाम
तरीही होतो घात ।
कष्टाचे होते पाणी
नाही कशाची साथ ।
Sanjay R.
भूतकाळ विसरा आता
हवा भविष्याचा विचार ।
चला घेहू या झेप उंच
करू भविष्यात संचार ।
झाले गेले विसरून आता
टाकू पाऊल एक पुढे ।
नवनवीन येतील अनूभव
गिरवू आयुष्याचे धडे ।
Sanjay R.
नकळत कधी
होतो एक गुन्हा ।
जडते मग सवय त्याची
करतो पुन्हा पुन्हा ।
अशीच कधीतरी
लागली ती सवय ।
चोरीच होती ती
नेले चोरून हृदय ।
नकळत झाले सारे
हवा वाटायचा एकांत ।
मनाने सोडला ताबा
झाले ते संथ ।
हरवायचो आठवणीत
शुद्ध नसे कशाची ।
चाहूल लागता तिची
होई धडधड श्वासांची ।
ती मात्र जगावेगळी
पत्ताच नव्हता कशाचा ।
हरवलेला मी असा
दोष माझ्याच मनाचा ।
एकदा झाली गाठ
कडी चिमुकले बाळ ।
परतलो मी भानावर
प्रेमाचा तो अंत काळ ।
Sanjay R.