Tuesday, August 30, 2022

त्राही त्राही

शब्दांना तर असतो अर्थ
सांगून जातात बरंच काही ।
कानावर घेऊन सोडून देता
शब्दांना काहीच अर्थ नाही ।
हृदयाला जे स्पर्श करतात
अंतरात मग फुटते लाही ।
कधी मस्तकाचा घेताच वेध
जिकडे तिकडे त्राही त्राही ।
Sanjay R.

जय जय शिवराय

स्वराज्यासाठी कितीकांनी
दिले प्राणाचे बलिदान ।
देऊनिया प्राण आपुले
झालेत किती महान ।
मराठ्यांचा इतिहास हा
महाराष्ट्राची शान ।
जय जय शिवराया
तुम्हास आमचा प्रणाम ।
Sanjay R.


प्रेमाला कुठे अंत

प्रेमाला कुठे अंत
वाहतं पाणी
आणि तेही संथ ।

नाही वयाचे बंधन
म्हातारं झालं जरी
हृदयात होते स्पंदन ।

नाती गोतीही सरतात
प्रेमापुढे विचारही
का कसे ते हरतात ।

प्रेमात कुठला स्वार्थ
पण असतो नक्कीच
जीवनाला तिथे अर्थ ।

प्रेम म्हणजे भक्ती
अति प्रचंड अशी ती
असते एक शक्ती ।

म्हणे प्रेमात तो पागल
कळेना कुणासच
अंतापर्यत तो जागल ।

प्रेम कराल तर कळेल
कुणासाठी माझंही हो
मन तितकंच जळेल ।
Sanjay R.


हास्य आनंद

रंग कसा या जीवनाचा
गन्ध त्यात भावनांचा ।

क्रोधाला नाही माया
सोबत असते सदा छाया ।

शब्दातून शब्द येतात
घायाळ मन करून जातात ।

चेहऱ्यावरती भाव कसे
राग क्षणात उठून दिसे ।

रूप नको ते तसे मजला
हास्य हवे ते देईल तुजला ।

हृदयावरती बंधन कुठले
होऊन आनंद सारे सुटले ।
Sanjay R.


नकोच हा दुरावा

नकोच हा दुरावा
असेल तू दूर जरी ।
नेहमीच वाटे मनाला
नकळत येतील सरी ।
क्षणोक्षणी होतात भास
कथा ती असेल खरी ।
रंभा किव्वा उर्वशी
इंद्राघरची ती तूच परी ।
Sanjay R