बोलू नकोस काही
मज अपेक्षाही नाही ।
अक्षरात शोधतो मी
दिसते कुठे काही ।
भाव तोच मनात
डोळे वाट पाही ।
मन झाले अधीर
शोधतो दिशा दाही ।
पुरे एक इशारा
त्यातच सर्व काही ।
करू नकोस वेळ
अंतराची होते लाही ।
Sanjay R.
बोलू नकोस काही
मज अपेक्षाही नाही ।
अक्षरात शोधतो मी
दिसते कुठे काही ।
भाव तोच मनात
डोळे वाट पाही ।
मन झाले अधीर
शोधतो दिशा दाही ।
पुरे एक इशारा
त्यातच सर्व काही ।
करू नकोस वेळ
अंतराची होते लाही ।
Sanjay R.
वाह रे वा कोरोना
तू आलास का परत ।
करमत नसेल ना तुला
माणसं का नाही मरत ।
कितिकांना घेऊन गेलास
पाणी डोळ्यात तू भरत ।
तरी दोन वेळा घेतली लस
पण कारे तूच नाही मरत ।
आप्त गेले पैसा गेला
अजूनही आहेत ते रडत ।
जगण्यासाठी बघ कसे ते
आहोत रे आम्ही लढत ।
मास्क लावला हातही धुतले
स्यानिटायझर आहोत मळत ।
कोणी म्हटलं येतो घरी तर
नको येऊस उत्तर देतो पळत ।
शाळा बुडली नोकरी गेली
संसार किती आहेत जळत ।
सोडणारे भाऊ पाठ आता
हे तुलाच कारे नाही कळत ।
सरकारचे तर नियम भारी
तरीही सारेच आहेत पाळत ।
चिंता लागली साऱ्यांनाच
असतो एकमेकास टाळत ।
देऊ नकोस रे दुःख आता
बसणार किती तू छळत ।
मनात या भीती किती
विचारही नाहीत ढळत ।
Sanjay R.
गंगा तू गं यमुनाही तू
सिंधू तूच सरस्वती ।
आई तू आणी माई तू
मायेचा तू सागर होती ।
कोण कुठले अनाथ सारे
साऱ्यांशी तू जोडली नाती ।
करून पोरके गेलीस तू
आठवणी उरल्या आता हाती ।
Sanjay R.
नव्या कल्पना नवी सुरुवात
वाटे जणू झाली प्रभात ।
मनासारखे घडते जेव्हा
पटापट चाले कसा हात ।
कुठे काही न पडे कमी
उत्साह असे भरभरून मनात ।
Sanjay R.
नववर्षाचा दिवस उजाडला
झाली आनंदाची बरसात ।
नाते करू या दृढ आता
मित्रांपासून करू सुरुवात ।
काळजी घेऊन आरोग्याची
करू दुःखावरती मात ।
क्षणोक्षणी या जीवनात
आपल्यांचीच मिळेल साथ ।
Sanjay R.