वाह रे वा कोरोना
तू आलास का परत ।
करमत नसेल ना तुला
माणसं का नाही मरत ।
कितिकांना घेऊन गेलास
पाणी डोळ्यात तू भरत ।
तरी दोन वेळा घेतली लस
पण कारे तूच नाही मरत ।
आप्त गेले पैसा गेला
अजूनही आहेत ते रडत ।
जगण्यासाठी बघ कसे ते
आहोत रे आम्ही लढत ।
मास्क लावला हातही धुतले
स्यानिटायझर आहोत मळत ।
कोणी म्हटलं येतो घरी तर
नको येऊस उत्तर देतो पळत ।
शाळा बुडली नोकरी गेली
संसार किती आहेत जळत ।
सोडणारे भाऊ पाठ आता
हे तुलाच कारे नाही कळत ।
सरकारचे तर नियम भारी
तरीही सारेच आहेत पाळत ।
चिंता लागली साऱ्यांनाच
असतो एकमेकास टाळत ।
देऊ नकोस रे दुःख आता
बसणार किती तू छळत ।
मनात या भीती किती
विचारही नाहीत ढळत ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment