अडगळ घेते जागा
तोच दुराव्याचा धागा ।
घालावा दूरच जरासे
कसेही तयाशी वागा ।
उरलेच काय आता
कशास कुणास मागा ।
करूच नका विचार
चला कामास लागा ।
Sanjay R.
Friday, November 26, 2021
अडगळ घेते जागा
मन कधी हसते
डोळेच सांगून जातात
काय असते मनात ।
वारा थांबतो थोडा
बोलतो आपल्या कानात ।
मन कधी हसते
दिसते सारे चेहऱ्यात ।
वार असो कुठलाही
दुःख होते काळजात ।
शब्दांचे घाव कठीण
गाल मग रुसतात ।
वाचा होते अबोल
ओठ कुठे बोलतात ।
सुखाचा होताच पाऊस
क्षण आनंदाचे वेचतात ।
बदलून रूप आपुले
सगळेच सोबत हसतात ।
Sanjay R.
Thursday, November 25, 2021
विचारांचे ओझे
मनाच्या अडगळीत दडले काय
ढीग विचारांचा करू मी काय ।
मनात आहे जे जे आता
आठवते सारेच जाता येता ।
फुलतो मनात कधी आनंद ।
दुःखही सारेच हृदयात बंद ।
कधी वाटते नकोच काही
लुप्त होतात दिशाही दाही ।
जीवनाची तर हीच दशा
कधी चढते कशाचीही नशा ।
अबोल होते कधी मन माझे ।
फिरतो घेऊन सारेच ओझे ।
Sanjay R.
Wednesday, November 24, 2021
मन झाले शांत
मन झाले शांत
वाटे मज निवांत ।
विचार नाही काही
आता कसली खंत ।
नाही कशाची आशा
पाहू नकोस अंत ।
पदरात सदा निराशा
होईल मोठा ग्रंथ ।
चरणी ठेवितो माथा
पाव तूची एकदंत ।
तूच सर्व ज्ञाता
आहे तूच अनंत ।
Sanjay R.
जळते पणती
मनच झाले हे वादळ वारा
शमवू कसे कुठे किनारा ।
शांत करण्या हवा एकांत
सागर कधी का होतो शांत ।
लाटे वरती येईल लाट
नेई सारेच समुद्र अफाट ।
हवी मजला थोडी शांती
मिळेल केव्हा जळते पणती ।
Sanjay R.
Subscribe to:
Comments (Atom)